लखीमपूर खेरी: संयुक्त किसान मोर्चाची योगेंद्र यादव यांच्यावर मोठी कारवाई

लखीमपूर खेरीच्या घटनेनंतर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांच्यावर संयुक्त किसान मोर्चाची मोठी कारवाई, कारवाईचं कारण काय?

Update: 2021-10-22 10:15 GMT

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने योगेंद्र यादव यांच्यावर कारवाई केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यामुळं ही कारवाई केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने यादव यांना एका महिन्यासाठी निलंबित केले आहे.

या काळात तो किसान मोर्चाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. पंजाबच्या शेतकरी संघटनांनी यादव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. लखीमपूर खेरी घटनेत शेतकऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांनी चिरडले होते. या घटनेत एकूण 8 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 4 शेतकरी होते.

भारतीय किसान युनियन चे दोआबाचे अध्यक्ष मनजीतसिंग राय यांनी एनडीटीव्हीला ला ही माहिती दिली आहे. 32 शेतकरी संघटनांनी यादव यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्याबद्दल जाहीरपणे माफी मागण्याची मागणी केली आहे.

यावर योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मृत भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कोणतीही चूक केलेली नाही, परंतु किसान मोर्चाला याविषयी पूर्व सूचना न दिल्यामुळे ते माफी मागण्यास तयार आहेत.

तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू

लखीमपूर खेरीच्या घटनेत शेतकऱ्यांसह भाजपचे तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शुभम मिश्रा, श्याम सुंदर निषाद आणि हरी ओम मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या ताफ्यात असलेल्या दोन वाहनांनी शेतकऱ्यांना चिरडले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी केलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान विरोधी पक्षाच्या प्रचंड दबावानंतर पोलिसांनी आशिष मिश्राला ला अटक केली आहे.

आत्तापर्यंत 10 लोकांना अटक

या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेते सुमित जयस्वाल यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका वाहनात तो उपस्थित होता आणि घटनेनंतर पळून गेला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो स्पष्ट दिसत होता.

दरम्यान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी सातत्याने या संदर्भात बोलताना घटनेच्या वेळी आशिष मिश्रा हा वाहनात नव्हता असं सांगत आहेत. आशिष मिश्रा ने देखील हेच सांगितले आहे. परंतु त्या वेळी आशिष मिश्रा वाहनात उपस्थित होता का याची चौकशी गुन्हे शाखा आणि एसआयटी करत आहेत

बर्खास्तीची मागणी...

लखीमपूर खेरी घटनेतील मुख्य आरोपीचे वडील अजय मिश्रा टेनी यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

लखीमपूर खेरीच्या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलनही केले आहे. त्यांचा देशभरातील 160 हून अधिक गाड्यांवर परिणाम झाला. या घटनेपासून उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये शेतकरी आणि विरोधक सातत्याने आंदोलन करत आहेत. 26 ऑक्टोबर रोजी लखनौमधील मुझफ्फरनगर महापंचायतीच्या धर्तीवर शेतकऱ्यांनी रॅली काढण्याची घोषणा केली आहे..

Tags:    

Similar News