धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या करुणा मुंडे
शेतकऱ्यांचं जगणं चहूबाजूंनी कठीण झालं आहे. कधी भारत-अमेरिका करारामुळे तर कधी अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे… अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. गहू, ज्वारीचे पिकं आडवे झाल्यानं शेतकरी शेतात रडत बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान करुणा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मानदेखेल गावातील महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. तसेच आमदार, खासदार कुठे आहेत? शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे याची पाहणी करायला कधी येणार? असा सवालही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.