Dr. B. R. Ambedkar Mahad movement २० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिवस... या सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली केलेला पाण्यासाठीचा संघर्ष हा केवळ पाण्यासाठी नसून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी केलेला संघर्ष आहे. बाबासाहेबांनी समतेसाठी या तळ्यावर जाऊन एक ओंजळ पाणी प्यायले आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे हे समाजाला पटवून दिलं. सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा समतेसाठी आंदोलन करण्याची गरज आहे. असं अभिनेता किरण माने यांनी महाड क्रांती शताब्दी कार्यक्रमाच्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान या कार्यक्रमात किरण माने यांनी केलेले भाषण नक्की ऐका आणि विचार करा...