JUSTICE FOR JEYASRE च्या निमित्ताने स्त्री कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तामिळनाडूमध्ये 20 वर्षीय दलित मुलीचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. या अमानवीय घटनेच्या निमित्ताने देशभरातल्या गारमेंट फॅक्टरीमध्ये स्त्री कामगारांवर होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध कायदे आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी का होत नाही? यासंदर्भात रेणुका कड यांचा 'स्त्री कामगारांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत सद्यस्थिती' सांगणारा लेख...

Update: 2021-05-04 12:29 GMT

जएसरी काथिरवेल, तामिळनाडुच्या एच &एम फॅशन ब्रॅंडच्या सप्लायर असलेल्या नची गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी २० वर्षीय दलित समाजातील मुलगी. १ जानेवारी २०२१, तामिळनाडुमधील दिंडीगुल जिल्ह्यात जएसरी काथिरवेलची बलात्कारकरून हत्या करण्यात आली. तामिळनाडु पोलिसांनी तिच्या फॅक्टरीमधील सुपरवायझर व्ही. थांगदुराईसह अन्य दोन जणाविरुद्ध तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सध्या सर्व गुन्हेगार पोलिस कस्टडीत आहेत. जएसरीची बलात्कार करून हत्या केल्यामुळे पुन्हा जातीयवादातून स्त्रियांवर होणार्यात लैंगिक हिंसाचार, बलात्कार, हत्यासारख्या अमानवीय घटनांना अधोरेखित केले आहे.

२१ एप्रिल रोजी जएसरीला न्याय मिळवा म्हणून ऑनलाइन ग्लोबल विगल- जस्टीस फॉर जएसरे म्हणून मीटिंग आयोजित केली होती. यामध्ये गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्याए स्त्रियांना लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी, असमान वेतन, कामाचे तास, ओवरटाइम करूनही पैसे वेळेवर न मिळणे, काही वेळा कमी पैसे मिळणे किंवा कधी कधी केलेल्या कामाचे पैसेचे दिले जात नाही अशा सगळ्या मुद्द्यावर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. अन्य देशातही गारमेंट फॅक्टरीमध्ये स्त्रियांना असाच प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत आहे.

कोविडमुळे स्त्रियांच्या रोजगाराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. नोकर्या्मध्ये शाश्वती राहिली नाही. अनेक वेळा स्त्रिया त्यांच्यावर होणार्याा लैंगिक अत्याचाराबद्दल बदनामी होईल, नोकरीवरून काढून टाकलं तर कुटुंब कसं चालवायच ह्या भीतीने अत्याचार सहन करत असतात. देशात कायदे अस्तित्वात आहेत पण त्यांची माहिती नसणे, कायद्याची अंमलबजावणी यामुळे पीडित स्त्रीला न्याय मिळणे कठीण होऊन जाते.

जएसरीच्या घटनेनंतर आशिया वेज फ्लोर अलायन्सच्या (Asia Wage Floor Alliance) माध्यमातून नची अॅसपरेलमधील जएसरीसोबत काम करणाऱ्या काही महिला कामगारांसोबत त्यांनी चर्चा केली. तेव्हा त्यातील सात महिला कामगारांनी सांगितले की, त्यांच्या सुपरवायझरने जएसरीचा अनेकदा लैंगिक छळ केला होता.

त्यांनी असेही नमूद केले आहे की, सुपरवायझरने यापूर्वीही इतर महिलांवर लैंगिक छळ केल्याच्या घटना आहेत. महिला कामगारांनी हेही निदर्शनास आणून दिले की, कारखान्यात लैंगिक छळ आणि हिंसाचाराची बरीच उदाहरणे आहेत. त्यात महिलांना अश्लील नावांनी बोलावणे, त्याच्यासोबत गुंडगिरी, मारहाण आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनाही पूर्वी घडल्या आहेत. आशिया वेज फ्लोर अलायन्सच्या अहवालनुसार थांगदुराई आणि जगननाथन यांनी जएसरेचा बलात्कार करून हत्या केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जएसरीच्या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी महिला कामगारांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपल्या देशात २०१३ कामाच्या ठिकाणी होणार्यां महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, बंदी, आणि निवारण ) कायदा लागू करण्यात आला आहे. ह्या कायद्यानुसार सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था, मनोरंजनाची आणि खेळाची ठिकाण, शैक्षणिक संकुल अशा सर्व ठिकाणी या कायद्याअंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण अनिवार्य आहे. तरीही आज अनेक ठिकाणी अशा समित्या स्थापन झालेल्या दिसत नाही. जिथे स्थापन झाल्या आहेत तिथे बैठका नियमित होत नाही. असे दिसून येते. हल्ली बहुतांश कार्यालयीन क्षेत्रात अद्यावत यंत्रणा वापरली जाते.

आपल्या कर्मचार्याेवर देखरेख ठेवण्यासाठी थंम्ब इंप्रेशन, सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा वापरल्या जातात. मात्र नची अॅापरेलमध्ये ज्या ठिकाणी महिला कामगार काम करतात तिथे अशी कोणतीही यंत्रणा दिसून आली नाही असे आशिया वेज फ्लोर अलायन्सने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. यामागे कारखान्यात स्त्री कामगाराचा छळ केला जातोय. याची कोठेही नोंद होऊ नये असा हेतु कारखानदारांचा असू शकतो का? ही शंकाही यात उपस्थित केली आहे.

स्त्री कामगारांच्या होणार्यात लैंगिक शोषणा संदर्भात अज्ञात व्यक्तीने तामीळनाडु टेक्सटाईल अँड कॉमन लेबर युनियनकडे (टीटीसीयू) तक्रार नोंद केल्याची माहिती नमूद केली आहे. पण यावर फारशी दखल घेतली गेली नाही. तसेच कारखान्यामध्ये ९० % सुपरवायझर हे पुरुष आहेत. केवळ १०% स्त्रिया अधिकारीपदावर कार्यरत आहे. यावरून कारखान्यातील लिंगभाव आसमानतेचे प्रमाण दिसून येते. कारखाण्यात लिंगगुणोत्तर प्रमाणात प्रचंड तफावत तर आहेच शिवाय कामगार म्हणून तरुण स्त्री कामगारांचे प्रमाण मोठे आहे. यातील बहुतांश स्त्री कामगार या गरीब घरातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या मुलीचे आहे.

जएसरीच्या घटनेने रोजगारासाठी घराबाहेर पडणार्याश, रोजगारासाठी स्थलांतरित होणार्याफ असंख्य मुलीच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नची फॅशन ब्रॅंड ही ईस्टमॅन एक्सपोर्ट्स एक कंपनी असून ती भारताची चौथी सर्वात मोठी वस्त्र-निर्यात कंपनी आहे. याठिकाणी महिला तक्रार निवारण समिती, फॅक्टरी अॅक्टनुसार महिला कामगारासाठी असलेल्या सोयीसुविधा देणे क्रमप्राप्त होते.

१९४८ मध्ये फॅक्टरीज अॅमक्ट अस्तित्वात आला. या कायद्याचा मूळ हेतू असा आहे की, कारखान्यात नोकरीला असलेल्या कामगारांना आरोग्य, कामाचे तास, सुरक्षितता, वेलअर, भरपगारी रजा इत्यादी लाभांची शाश्वती मिळावी व कामगारवर्गाची मालकवर्गाकडून पिळवणूक होऊ नये. शिवाय भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे स्त्री-पुरुष कामगारांना समान वेतन करार १९५१, कामगारांची सामाजिक सुरक्षा करार १९५२ , C111 Discrimination (Employment and Occupation) Convention, 1958 , C111 Discrimination (Employment and Occupation) Convention, 1958 , C118 Equality of Treatment (Social Security) Convention, 1962, C156 Workers with Family Responsibilities Convention, 1981 , C183 Maternity Protection Convention, 2000 मान्य केले आहेत. पण मूळ मुद्दा अंमलबाजवणीचा आहे.

एकंदरीतच जगभरात गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्या स्त्रियांची स्थिती हा चिंतेचा विषय आहे. १९०९ मध्ये महिला दिन साजरा करण्याची सुरुवात झाली होती ती मुळात वस्त्र कारखान्यात काम करणार्याम स्त्री कामगारांच्या कामाचे तास, समान वेतन या हक्कासाठी. १९०९ ते २०२१ मध्ये गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्यार स्त्रियांचे प्रश्न तेच आहेत. फक्त स्वरूप काय बदलेल तर कायदा अस्तित्वात आला मात्र कायद्याचे अस्तित्व स्त्रियांचे प्रश्न, स्त्री कामगार म्हणून कारखान्यात सुरक्षित वातावरण, समान वेतन यासाठी आजही स्त्रियांना झगडावे लागत आहे.

गेल्यावर्षभरापासून असंघटित क्षेत्रात काम करणार्या् सर्व क्षेत्रातील स्त्रियांची उपजीविका टाळेबंद झाली आहे. ज्या स्त्रिया काम करत आहे त्यांना त्याच्या वेतनामध्ये आणि कामाच्या तासांमध्ये तडजोड करावी लागत आहे.

इंटरनॅशनल लेबर राइट्स फोरमच्यावतीने 'JUSTICE FOR JEYASRE' ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये जएसरेला न्याय मिळण्यासाठी आशिया फ्लोर वेज अलायन्स, मानवाधिकार संघटना, तामिळनाडु टेक्सटाईल अँड कॉमन लेबर युनियन, स्वतंत्र कामगार संघटना आदि सहभागी झाल्या आहेत. यामध्ये काही मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या आहेत त्यापुढील प्रमाणे :

१. काथिरवेल कुटुंब आणि जएसरीच्या सहकारी महिलांच्या जीवाला धोका आहे यासाठी एच&एम ने त्यांना संरक्षण द्यावे..

२. एच&एम ने टीटीसीयू या कामगार संघटनेची मान्यता स्वीकारून नची अॅसपरलमधील कामगारांच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले पाहिजे.

३. एच&एम ने स्वत:ला यातून वगळूने नये आणि बाहेर पडल्याचा प्रयत्नही करू नये.

४. एच&एम ने कारखान्यात होणारे लैंगिक छळाचे प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधनात्मक पाऊले उचलली नाहीत तसेच कारखान्यामधील अंतर्गत ऑडिट व्यवस्थाही कुचकामी ठरली तसेच यापूर्वी घडलेल्या लैंगिक छळाच्या घटनेकडे लक्ष देण्यास अपयशी ठरलो. हेही मान्य करावे.

५. नची अॅकपरलमधील सर्व कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी टीटीसीयू युनियनच्या सहभागाने ब्रँड्स आणि त्यांचे सप्लायर, इस्टरमॅन एक्सपोर्ट यांच्यामधील पुरवठा साखळी मॉडेल संपविण्यासाठी समावेश करून लेखी करार व त्याची अंमलबाजवणी करावी म्हणजे लिंगभेदावर आधारित होणारा हिंसाचार रोखण्यास मदत होईल.

Workers जएसरी काथिरवेलच्या मृत्यूने पुन्हा एकदा भारतीय समाजातील जातीव्यवस्था, जातीय भेदभाव आणि स्त्रियांच्या मानवी हक्कांची दाहकता पुढे आणली आहे. कामाच्या ठिकाणी स्त्रिया-मुलींची सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केले आहे.

स्त्रियांच्या मानवी हक्काचा विचार करताना भारतीय समाज म्हणून जातीव्यवस्थेची उतरंड आणि त्याचा परिणाम आजही मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी समाजातील स्त्रियांना सोसावा लागतो.

'स्त्री जन्मत नाही तर घडवली' जाते हे वाक्य स्त्री चळवळीत काम करत असताना कायम अनुभवला येते. पण जाती व्यवस्थेची प्रथा म्हणून पाहत असताना, ज्या स्त्रिया शोषणाच्या बळी आहेत आणि ज्या स्त्रिया जातीधर्माच्या नावाखाली शोषनाला बळी पडतात. तेव्हा भारतीय मानवी हक्क कार्यकर्ते मार्टिन मेकवाना यांच्या पुस्तकातील

'दलितात दलित कोण तर स्त्री'

हे वाक्य मनात कोलाहल निर्माण करते.

जएसरी काथिरवेलच्या प्रकरणाची दखल भारतीय माध्यमांनी घेतली नसली तरी जागतिक स्तरावर याचे अनेक पडसाद उमटत आहे. जएसरीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्‍या ७५ दशलक्ष स्त्रियांची कामाच्या ठिकाणची सुरक्षा, समान वेतन आणि कामगार म्हणून सुविधाचा मुद्दा उपस्थित झाला.

फॅशन आणि गारमेंट इंडस्ट्रीचे उत्पन्न २.४ ट्रिलियन डॉलर असल्याचा अंदाज solidarity centre या संस्थेने त्याच्या २०१७ च्या अहवालात वर्तवला आहे. फॅक्टरी मालक उत्पन्नाच्या १५% पेक्षा कमी मोबदला गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणार्‍या स्त्रिया आणि मुलींना देतात.

तरीही स्त्रिया-मुली परिस्थितीशी तडजोड करून आपलं कुटूंब चालविण्यासाठी मिळेल त्या मोबदल्यात काम करून कुटुंबाचे संगोपन करतात. मात्र, हे काम करत असताना त्यांना संकटांचा सामना करावा लागतो. कामाचा कमी मोबदला,बारा बारा तासांची शिफ्ट, सुविधांचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी असुरक्षित वातावरण आणि सुपरवायझर म्हणून असलेला पुरुष आणि त्याच्याकडून होणारा छळ. यातही जातीव्यस्थेचा पगडा दिसून येतो. बर्‍याच वेळा मुली चुपचाप सगळं सहन करत असतात. यात एखादीने आवाज उठवला तर तिचे काम जाते किंवा स्वत:चा जीव गमवावा लागतो.

जएसरी काथिरवेलच्या घटनेने भारतीय समाजातील पुरुषसत्ताक या सामाजिक संरचनेतून स्त्री कामगारांचा विचार केल्यास, पुरुषसत्ता या व्यवस्थेमुळे स्त्री कामगारांना औद्योगिक क्षेत्रात दडपशाही आणि शोषणाला सामोरे जावे लागते हे अधोरेखित केले आहे.

श्रमिक म्हणून त्यांना दुय्यमत्वाचा दर्जा किंवा वागणूक मिळते. स्त्री आणि पुरुष यांच्या कामाचे वाटप लिंगभाव विभाजनावर आधारित असते. पुरुषांच्या तुलनेने त्यांच्याबरोबर किंवा अधिक काम करूनही स्त्री कामगारांना वेतन हे पुरूषांपेक्षा कमीच दिले जाते.

ह्या पुरुषसत्ताक समाजात वर्ग आणि कामगाराच्याप्रमाणे जातीधर्माच्या आधारेही स्त्रियांचे स्थान हे दुय्यम ठरत असते आणि पुरुष कायम वरचढ ठरतात. या परिस्थितीला पुरुषी मानसिकता जबाबदार ठरते आणि तेवढीच जाती धर्माची उतरंडही जबाबदार ठरते.

यातूनच स्त्रीच्या शरीराला नेहमीच पुरुषाची संपत्ती मानली जाते, स्त्रीला धडा शिकवायचा असेल तर तिच्या आत्मसन्मानाला पायदळी चिरडले जाते. यातूनच जएसरी काथिरवेल सारख्या दुर्दैवी घटना घडतात.

हे घडू नये म्हणून आपण काय करावे किंवा करू शकतो? हा विचार महत्वाचा आहे. कायदे आहेत पण अंमलबजावणीचा प्रश्न शेष आहे. कायद्याला मागे ठेवून मानवी हक्काच्या परिप्रेषातून विचार केला तर आपल्या देशातील संतांची शिकवण आणि भारतीय संविधानातील मूल्य हाच एक मार्ग आहे असे मला वाटते.

महिलांना चूल आणि मूल या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या लोकांना हीच संताची मानवतेची शिकवण मार्ग दाखवेल. अन्यथा जएसरी काथिरवेल सारख्या घटना सतत घडत राहतील. जयश्रीची बलात्कार करून हत्या केल्यामुळे पुन्हा जातीयवादातून स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक हिंसाचार, बलात्कार, हत्यासारख्या अमानवीय घटनांना अधोरेखित करत राहतील. आणि भारतीय समाजातील पुरुषसत्ताक प्रवृत्ती वाढत जाईल. म्हणून स्त्रियांना एकाच भिंगाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या या लोकांना मानवतेची शिकवण देणं गरजेचं आहे.

रेणुका कड...

संदर्भ :

१. https://remake.world/stories/news/garment-worker-raped-killed-at-hm-supplier-factory-in-india/

२. https://labour.gov.in/sites/default/files/Hyperlink1.pdf

३. https://www.reuters.com/article/us-india-workers-trfn-idUSKBN2771PK

४. https://feminisminindia.com/2020/05/29/increased-working-hours-women-garment-orkers

Similar News