देवेंद्र फडणवीस, शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत का? : प्रा. हरी नरके

Update: 2021-09-17 07:00 GMT

प्राध्यापक हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात...

भाजप नेते देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी निकालाबाबत जो प्रचार करीत आहेत, तो पाहता त्यांच्या लॉ च्या पदव्या बोगस असाव्यात अशी शंका येते. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राज्यघटनेच्या कलम १४२ खाली दिलेला असल्याने तो सर्व देशाला लागू झालेला आहे. त्यानुसार सर्व देशातले ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे.

(पहा: निकालपत्र, परि.२६ व भारतीय संविधान, कलम १४२)


 






 

ही वस्तुस्थिती दडवून हे दोघेही या निकालाबाबत वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. फक्त महाराष्ट्रातले आरक्षण गेले असून बाकी सर्व राज्यातील आरक्षण कायम असल्याचे ते सांगत असतात.

या दोघांनाही न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कोर्टात खेचायला हवे. वकिलीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जी माहिती असते ती यांना नसेल तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगसच असणार!

मात्र त्यांचा हा खोटेपणा उघडा पाडण्याऐवजी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मौन बाळगून बसले आहेत. यामागे त्यांचे अज्ञान आहे की ओबीसीबाबतची उदासीनता? असा प्रश्न तमाम ओबीसी मतदार विचारीत आहेत.

प्रा. हरी नरके

Tags:    

Similar News