डॉ. नरेंद्र दाभोळकरांबद्दल बोलतोय मी...
superstition crisis in Maharashtra ज्यांनी आयुष्यभर अत्यंत शांतपणे... सातत्यानं समाजातील अंधश्रद्धांना कडाडून विरोध करत तर्कनिष्ठ समाज व्हावा म्हणून समाज प्रबोधन करण्याचा, विज्ञाननिष्ठ समाज घडवण्याचा एकट्याने अशक्यप्राय प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या प्रयत्नांचे बक्षीस म्हणून पुरोगामी महाराष्ट्राचा सनातन महाराष्ट्र झालेल्या राज्याने त्यांचा 'नर'बळी घेतला. डॉक्टर दाभोलकर कुणी भोंदू डॉक्टर नव्हते. चांगले एमबीबीएस फिजिशियन डॉक्टर होते. हल्ली कोणत्याही भांड विद्यापीठांमधून सातवी पास झालेल्या शेठ राजकारण्यांनी डॉक्टर या पदवीने सन्मानित केले जाते. डॉक्टर या प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित वैज्ञानिक शैक्षणिक पदवीची लाज घालवली आहे सगळ्यांनी.! तर उच्च ब्राम्हण कुळात जन्मलेले साताऱ्याचे सुपुत्र नरेंद्र दाभोलकर आपला चांगला चालणारा दवाखाना चालवता चालवता अंधश्रद्धा निर्मूलनाचे ईश्वरीय सामाजिक काम अत्यंत मनापासून करायचे.!
केवळ विज्ञानाने(च) जीवन आणि जगणं समृद्ध होतं यावर त्यांचा गाढ विश्वास होता. डॉक्टरांच्या आठवणीने सध्याच्या अगदी या जादूटोणा किंग खरातच्या महिन्यात मन व्यथित होत आहे. मुसलमानांना का नाही शिकवत तुम्ही हे सगळं असं म्हणत त्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांना डॉक्टर हसून शांतपणे सांगायचे, अरे मला आधी माझे घर स्वच्छ करू द्या की.! राज्याच्या विधानसभेत जादूटोणा विधेयक पास व्हावे म्हणून त्यांनी जीवाचे रान केले. पण तत्पूर्वीच आम्ही, त्यांच्या मराठी बांधवांनीच त्यांना गोळ्या घालून ठार मारले.! त्यांचा अपराध एकच होता की, ते समाजातील अंधश्रद्धांवर बोट ठेवायचे. कदाचित त्यामुळे ज्यांची हजारो वर्षे समाजातील अंधश्रद्धेवरच दुकाने चालत आली असतील त्यांचा कोप झाला.
नरेंद्र दाभोळकर. अत्यंत सरळ साधा माणूस.. कुणाला कधीही अपशब्दही न बोलणारा.!
एकदा डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डॉ. श्रीराम लागू या दोन प्रतिष्ठित नास्तिक डॉक्टरांना एकाच व्यासपीठावर आणले गेले. त्यावेळी ईश्वराला रिटायर्ड करायला हवे असे डॉ. लागू यांचे मत होते. पण डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ही लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता केले पाहिजे असा आग्रह होता. ईश्वराच्या अस्तित्वाला सरसकट नाकारायला दाभोलकरांनी नाकारले.!
विशेष विसंगती म्हणजे डॉ. श्रीराम लागू यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आणि दाभोळकरांना गोळी घालून ढगात पाठवले गेले. मध्यंतरी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी खरातवर घेतलेल्या कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र दाभोळकरांचे वारसदार म्हटले आणि सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या.,!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर आहे. ते राज्याचे उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत प्रमुख आहेत. आणि खरात प्रकरणी त्यांनी उचललेली पावले नक्कीच स्पृहणीय आहेत..पण ताईंनी खूप घाई गेली अशी तुलना करताना.. असे अनेकांनी म्हटलेले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक साधूंची, महाराजांची उपस्थिती पाहता त्यांना थेट नरेंद्र दाभोळकरांचे पंगतीत बसवणे घाईचे ठरेल.! असो.
महाराष्ट्राला आज या खरात भूकंप प्रकरणाने राज्यात जादूटोणा, अघोर शास्त्र आणि अंधश्रद्धेचे किती स्तोम माजले आहे हे कळले असेल असे गृहित धरायला हरकत नाही. आज कदाचित..कदाचित. पॉईंट झिरो झिरो टक्के डॉक्टर दाभोळकर हयात असते आणि त्यांना आणखी हजारो हात अंधश्रधा निर्मूलनासाठी मिळाले असते तर..
असंख्य खरात निर्माण होण्यापासून कदाचित महाराष्ट्र वाचला असता.! डॉक्टर...तुमची खूप आठवण येते. तुमची अनुपस्थिती मागासलेल्या बुरसटलेल्या जादूटोणा काळात प्रकर्षाने जाणवते.! डॉक्टर.. आज तुम्ही हवे होतात..