Mass Leadership : समाजमाध्यमे, PR Companies आणि Political Strategists च्या धोरणांतून खरेच लोकनेते घडत आहेत का?

समाजमाध्यमे, PR Companies आणि Political Strategists च्या धोरणांतून खरेच लोकनेते घडत आहेत का? वाचा फेसबुक ब्लॉगर निलेश अभंग यांचा लेख

Update: 2026-02-14 05:23 GMT

Social Media सोशल मीडियावर टाकण्यासाठी नेत्यांचे Video बनवणारी मुले आता महापालिका सभागृहात (Floor) पोचली आहेत. साहेब काही बोलले की लगेच व्हिडियो बनवू लागतात आणि त्यातला एखादा बरा वीडियो सोशल मीडियावर टाकला जातो. वरपासून खालपर्यंत राजकारण दिखाव्याचे झाले आहे. मात्र गेल्या दहा वर्षात PR कंपन्या, Political Consultants, Political Strategists लोकांमुळे नेत्याचा जनतेशी Connect कमी झाला. Strategy भोवती सारे राजकारण फिरू लागले, जी फक्त नेत्यासाठीची रंगरंगोटी (Perception) होती, ज्या रंगरंगोटीचा जनतेला थेट लाभ मिळणार नाही मात्र त्यांचे सकारात्मक मत त्या नेत्याच्याबाबतीत तयार होते, त्या नेत्याचा जनतेशी जेव्हा सामना होईल तेव्हा जनतेला कळतेच की आपण उगाच ह्याला फार मोठा नेता समजत होतो, वास्तवात हा फार किरकोळ आहे.




 


जनतेत न जाता आपल्याबाबत मत बनवणे नेत्याला राजकारणात दीर्घकाळ टिकवून ठेवू शकत नाही. नेत्याला जनतेची कामे करावी लागतात, त्यांचे जीवन कमी संघर्षाचे करावे लागते. त्यादृष्टीने निर्णय घ्यावे लागतात, फोनाफोनी करावी लागते, नेते जनतेशी ओबडधोबड संपर्क ठेवून खऱ्या अर्थाने Mass Leader बनू शकतात, अन्यथा नाही. गेल्या पंधरा वीस वर्षात Mass Leaders बनणे बंद झाले आहे. Corporates, उद्योगपतींच्या पैशाने नेता म्हणून मोठे होणे आणि उद्योगपतींचे हितसंबंध सांभाळत राजकारण करणे इतकेच गेल्या पंधरा-वीस वर्षांत होत आहे. आमदार, खासदारापासून ते वर दिल्लीपर्यंत हे असेच चालले आहे.

स्थानिक राजकारणात अजून इतके होत नाही, कारण प्रभागापुरता खर्च करण्याची क्षमता स्थानिक पुढाऱ्यात असते, त्यांचे अनेक वैध-अवैध व्यवसाय असतात, त्या व्यवसायांना ते स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने संरक्षण मिळते, ते आपल्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक राजकारणात असतात. बरेचदा ते आपली मोनोपॉली Create करत धंदे करतात.



Political Strategists ना हाताशी धरून लोकप्रतिनिधी बनता येते, जनतेच्या डोळ्यात पाचेक वर्षे धुळफेक करता येते. पण नेत्याशी जे सामान्य जनतेचे जिवंत नाते असते ते विकसित होत नाही, यांच्याकडे गेले की आपले काम होणार, असा सामान्य जनतेला विश्वास वाटणे, हा Mass Leader चा महत्त्वाचा गुण असतो. शिवाय जनतेची सोय होईल असे प्रकल्प राबवणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठा रोजगार उभा करणे, मतदारसंघातील घरटी एखादा माणूस कामाला लावणे, यातून लीडर्स बनतात. यासाठी दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदमांचे नाव घेऊ शकतो. ह्या पिढीत असे अनेक नेते होते, ह्यांनी जिल्हेच्या जिल्हे सुधरवले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आठवून पाहा. अमुक ठिकाणी येणार म्हणले की काही हजार लोक दोन-तीन तासांत जमत होते. ह्या नेत्यांची जनतेशी घट्ट नाळ जुळलेली होती. शिवाय कोणीही Political Strategist त्यांच्या

दिमतीला नव्हता.

आजच्या कॉर्पोरेटच्या पैशाने, PR कंपनी, Political Strategist च्या सल्ल्याने काम करणारे नेते Mass Leaders होऊ शकत नाहीत. कारण ते जनतेच्या अडचणीत, संघर्षात कुठेच नाहीत, ते केवळ मीडियावर आहेत, सोशल मीडियावर आहेत. ह्यात ह्या नेत्यांचा तोटा मोठा आहे, त्यांची मुळे ते खोलवर रुजवू शकत नाहीत, तुम्ही लॉबींग करून फार काळ राजकारणात मोठ्या पदावर राहू शकत नाही, जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या नेत्याकडे कोणतेही पद नसले तरी त्याचा Relavance कमी होत नाही. तसेही त्याच्यावर कोणत्याच पदावर नसल्याची वेळ क्वचित वा अपवादानेच येते.


Similar News