Baramati By-Election 2026 : श्रद्धांजली की राजकीय खेळी? – पवारांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !
२०१४ लोकसभा निवडणूकीनंतर जेव्हा भारत सरकारचे ग्रामविकास मंत्री आणि बीडचे खासदार Gopinath Mundhe गोपीनाथ मुंढे साहेब यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. त्यानंतर बीड लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. पण शरद पवारांनी बीड लोकसभेत उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली आणि पडद्याआड काँग्रेसला तिथे उमेदवार उभा करायला लावला.
२०२६ मध्ये महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजितदादा पवार यांचे बारामती रनवेच्या बाजूला विमान कोसळून अपघाती निधन झाले. त्यानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. इथेही शरद पवारांनी आपला पक्ष बारामती विधानसभेत उमेदवार देणार नाही अशी घोषणा केली आणि पडद्याआड पुन्हा काँग्रेसला तिथे उमेदवार उभा करण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला लावल्या. उद्या दुपारी काँग्रेसचा उमेदवार बारामती निवडणूकीसाठी अर्ज दाखल करणार आहे.
२०१४ ची पुनरावृत्ती २०२६ मध्ये जशीच्या तशी होत आहे. फरक एवढाच आहे की २०१४ वेळी कट्टर विरोधक असलेल्या मुंढे साहेबांच्या घरातील उमेदवार होता आणि आता २०२६ वेळी स्वकीय असलेल्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. दरवेळी शरद पवारांची एकच लाईन असते गोपिनाथ मुंढेंना/अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक लढवणार नाही अशी असते.
बरं मग, राहुरीत शिवाजी कर्डीले या ज्येष्ठ आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय कर्डीले याला उमेदवारी जाहिर झाली पण तिथे मात्र शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर इथे का करत नाहीत? मुळातच पडद्याआड पवार घराणे सोंगट्या फिरवत असते आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडत असते.
अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना बारामती निवडणूक सोप्पी असू नये याची पुरेपूर काळजी शरद पवार घेतीलच पण स्वतः सुनेत्रा पवार यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना बारामतीत उमेदवार देऊ नये म्हणून साद घातली पण आपल्याच सासऱ्यांना त्यांनी कुठलाही भाव दिलेला नाहीये कारण त्या यांचे राजकारण ओळखून आहेत. एकदा शरद पवार सुनेत्रा पवार या पवार नाहीयेत असे भर पत्रकार परिषदेत बोलले होते.
स्वतः अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीच्या विरोधात पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जोरदारपणे लढवली होती. जगतापांच्या पत्नी निसटत्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. मुळातच कुठलीच निवडणूक/पोटनिवडणूक हि जबरदस्तीने बिनविरोध झाली नाही पाहिजे पण श्रद्धांजलीच्या नावाखाली पडद्याआडून ढोंगही करू नये.
(साभार - सदर पोस्ट रविकुमार सुभाषराव यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)