भोंदू बाबा खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, भोंदू बाबा खरात यांच्याकडून जे “औष्ण जल” घेतले, त्या सर्वांची नावे समोर आली पाहिजेत. याचबरोबर त्यांनी नागरिकांना सावध करत भोंदू आणि विकृत लोकांपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा या निवृत्त न्यायाधीश किंवा IPS अधिकारी असाव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेच, खरातांना मविआ सरकारने आरक्षित केलेले पाणी काढून टाकण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, Rupali Chakankar यांना टार्गेट केल्याबाबतही दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भोंदूगिरीच्या या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.