Life Insurance तुम्ही नसतानाही कुटुंब सुरक्षित ठेवणारा जीवन विमा
जीवन विमा का घ्यावा हे जाणून घ्या;
जीवनातील अनिश्चितता आणि आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देणारा जीवन विमा आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अपघात, आजार किंवा अकाली मृत्यू यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा वेळी जीवन विमा हा आर्थिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधार ठरतो.
जीवन विमा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर घेतलेला करार होय. विमाधारक ठराविक प्रीमियम रक्कम भरतो आणि त्याचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित कुटुंबीयांना ठरलेली रक्कम मिळते. ही रक्कम कुटुंबाच्या दैनंदिन खर्चांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी तसेच कर्जफेडीसाठी उपयोगी पडते.
सध्या बाजारात जीवन विम्याच्या विविध योजना उपलब्ध आहेत. टर्म इन्शुअरन्स हा शुद्ध संरक्षण देणारा स्वस्त आणि प्रभावी पर्याय असून, एंडोमेंट प्लॅन, मनी-बॅक पॉलिसी व युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन (ULIP) या योजना बचत आणि गुंतवणुकीची संधी देखील देतात. आपल्या गरजेनुसार ग्राहक योग्य पॉलिसीची निवड करू शकतात.
करसवलतीचाही फायदा जीवन विम्यामुळे होतो. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत विमा प्रीमियमवर सवलत मिळते. त्यामुळे संरक्षणाबरोबरच करबचतीचे दुप्पट फायदे मिळतात.
जीवन विमा का घ्यावा ?
आर्थिक संरक्षण: विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मदत.
प्रीमियम: ही पॉलिसी चालू ठेवण्यासाठी ठराविक कालावधीने दिली जाणारी रक्कम.