मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री दिपाली सय्यद या मुंब्रा-कळवा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी दिपाली सय्यद यांनी साकाळाई पाणी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आमरण उपोषण सुद्धा केलं होतं.
“जितेंद्र आव्हाड मला बहीण मानतात मात्र, त्यांचा बहीणीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि नजर वेगळी आहे.” अशी खंत दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलीय. “जितेंद्र आव्हाड अपशब्दही वापरतात, दिपाली सय्यद यांचा प्रचार केला तर माझ्याशी पंगा आहे अशा धमक्या त्यांच्या कार्यकर्त्यांना देतात” असं दिपाली सय्यद यांनी जितेंद्र आव्हाड यांचा विरोधात म्हटलं आहे.
मुंब्रा-कळवा मतदार संघात जनतेचे कोणते प्रश्न प्रलंबीत आहेत या विषयांवर दिपाली सय्यद याचं काय मत आहे जाणुन घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ...
https://youtu.be/XueRkHF_G7Q