अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय लोकशाहीवर आणि न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे. जो काही राममंदिरासंदर्भात निर्णय होणार आहे त्या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. सर्वांनी शांतता ठेवावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. असं आवाहान नितीन गडकरी यांनी केलं आहे.