स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात

Update: 2021-09-01 05:13 GMT

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून या यात्रेला करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून सुरुवात झाली.

2019च्या महापुच्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले आहे, प्रयाग चिखली येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे तब्बल पाच दिवस ही यात्रा पायी चालत जाऊन नरसिंह वाडी येथे जलसमाधी आंदोलनाची सांगता होणार आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजल्यापासून या प्रयाग चिखली येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

Tags:    

Similar News