स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचे सर्व पैसे भरल्याचा राज्य सरकारचा दावा साफ खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर मंत्री कुठेही दिसत नसून केवळ अधिकारी राज्य चालवत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी हा आरोप केला आहे.