सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पाकिस्तान मध्ये गेलेले चंदू चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण हे सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पाक मध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना भारतात सुखरुप आणण्यात आले होते.
मात्र, त्यांनी आज आपण आर्मीमधील अधिकाऱ्यांना कंटाळून राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून ‘मला अधिकाऱ्यांनी त्रास दिला, मला न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल’ असं या व्हिडीओत म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या व्हिडीओत चंदु चव्हाण यांनी मला न्याय मिळाला नाही तर आपण अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आर्मी प्रशासन नक्की आता काय भुमिका घेत हे पाहणं महत्वाचं आहे.