सध्या राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनावरुन महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणानंतर महाराष्ट्रातील महिला सुरक्षितते संदर्भात अनेक प्रकरण समोर आली आहेत. सोलापूर इथं तर एक भयंकर प्रकार समोर आला आहे.
सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.