भाजप आणि शिवसेनेची युती झाली खरी. मात्र यांच्यासमोर आता सर्वात मोठी डोखेदुकी ठरणार आहे. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत युतीला काही बंडखोरांनाच रोखण्यात यश आले. अनेक मतदारसंघात अजूनही बंडखोरी दिसून येत असल्यानं याचा फटका भाजप-शिवसेना महायुतीला बसू शकतो.
भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाल्यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आले आणि आयात उमेदारांना तिकिट मिळाल्यामुळेही पक्षातील नाराजी समोर आली. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर आघाडीला फायदा आणि युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, पुणे, कोकण, सोलापूर आणि नाशिक आणि मुंबईतील ३ जागांमध्येही बंडखोरी झाली आहे.