संघ समर्थक अधिकाऱ्यांमुळे आघाडी सरकारची कोंडी- बी.जी.कोळसे पाटील

Update: 2022-01-10 13:52 GMT

आघाडी सरकारच्या मनात काहीही असले तरी प्रशासनातील संघाचे समर्थक अधिकारी त्यांना यशस्वी होऊ देत नसल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. तसेच मालेगाव दंगल प्रकरणात निष्पाप लोकांना अडकवण्यात आल्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. मालेगावमध्ये बुरखाधारी लोकांनी दंगल केली आणि पोलिसांनी मात्र सर्व सामान्य मुस्लिम नागरिकांना गुन्ह्यात गोवले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसत नसतील त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, एकाच व्यक्तीला अनेक गुन्ह्यात अडकविण्याचे काम पोलिसांनी केलं आहे, याची सक्षम अशा समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने वेळीच याबद्दल पावलं नाही उचलली तर उच्च न्यायालयात याबद्दल दाद मागू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी बी.जी.कोळसे पाटील यांची भूमिका जाणून घेतली आहे.

Tags:    

Similar News