शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद - देवेंद्र फडणवीस

Update: 2019-11-02 14:18 GMT

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, डॉ सुरेश खाडे, महादेव जानकर उपस्थित होते.

‘नुकसान झाल्यामुळे अन्न गोड लागत नाही’

शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. या व्यतिरिक्त विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे.

राज्यात राष्ट्रपती शासन कसे लागू केले जाते?

पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

Full View

Similar News