सागरी किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अमित ठाकरे यांची मोहीम

Update: 2021-12-06 10:09 GMT

सागरी किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी एक खास मोहीम सुरू केली आहे. ११ डिसेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन अमित ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. राज्याला सुमारे ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पण यातील बहुतेक किनाऱ्यांवर अस्वछता असते. त्यामुळे अमित ठाकरे यांनी रविवारी एक व्हिडीओ शेअर करीत याबाबत जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पयार्वरण सेनेतर्फे ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सतीश नारकर यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News