राहुल गांधी यांची न्याय यात्रा 12 मार्चला नंदुरबार जिल्ह्यात, राहुल गांधीच्या उपस्थितीत जाहीर सभा

Update: 2024-03-05 03:22 GMT

 राहुल गांधी यांची  न्याययात्रा Bharat Jodo Nyay Yatra 12 मार्च ला नंदुरबार जिल्हात येणार आहे. यानिमित्ताने नंदुरबार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यानं माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

दरम्यान थोरात म्हणाले की "ही न्याय यात्रा काढण्याचे उद्देश देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. आताचं सरकार राज्यघटना पायदळी तुडवत आहे. देशात महागाई , बेरोजगारी ,गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्याचे जगणं आता महाग झाले आहे म्हणून या न्यायात्रेमुळे देशाच्या नागरिकांना एकत्र करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. न्याययात्रे निमित्त देशात राहुल गांधी फिरत आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी नंदुरबारला येत असून महाराष्ट्राची जाहीर सभेची सुरुवात नंदुरबार पासून होत असल्याचे" बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्ठीकोणातून नंदूरबारच्या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी काय बोलणार ? याकडे महाराष्ट्रसह देशाचं लक्ष लागला आहे     

Tags:    

Similar News