निवडणूकीत रवींद्रनाथ टागोरांचा पेहराव करणाऱ्या मोदींना 'टागोर जयंती'चा विसर; ट्वीटर अद्याप अभिवादनांची पोस्ट नाही

Update: 2021-05-07 05:48 GMT

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नोबेल पुरस्कारप्राप्त रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने मत मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक होताच,टागोर यांचा विसर पडला की काय असा पश्न उपस्थित होत आहे. कारण आज टागोर यांची जयंती असून,त्यांना पंतप्रधान कार्यालय किंवा मोदींकडून अभिवादन करण्याबाबतचा ट्विट अद्याप करण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणूक सुरू असताना अनेकदा पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्या सोशल मीडियावरून टागोर यांच्या नावाने मत मागितले जात होते. एवढंच नाही तर मोदींनी आपला पेहरावा सुद्धा टागोर यांच्याप्रमाणे केला होता. विशेष म्हणजे त्यांनी आपली दाढी टागोर यांच्यासारखी ठेवली होती.

पण मोदींना निवडणूक होताच टागोर यांचा विसर पडला आहे. आज सकाळपासून मोदी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून टागोर यांच्या जयंती बाबत अजूनही कोणताही ट्विट करण्यात आला नाही. त्यामुळे मोदींच टागोर यांच्याबद्दलचं निवडणूकीतील प्रेम कितपत खरं होतं? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

Tags:    

Similar News