महाराष्ट्राच्या शांततेला गालबोट लागेल असं करु नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्याचबरोबर देशात नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात आंदोलनं चालू आहेत. त्यामुळे आज संसदेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्या रांज्याची एक शान आहे तिला तडा जाईल असं कोणतेही कृत्य करु नका, तुम्हाला कोणीही रांज्याच्या बाहेर काढणार नाही, त्यामुळे घाबरण्याचं कोणतही कारण नसून तुमच्या हक्काना तडा जाणार नाही.
त्याचप्रमाणे मोर्च, आंदोलने, निर्दशने तुम्हाला करायची असतील तर शांततेच्या मार्गाने करा, माझ्याशी बोलायचं असेल तर मला भेटा. असं आवाहान संसदेत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे(Uddhav thackeray) यांनी रांज्यांला दिलं आहे.