शाहरूखच्या मन्नत बंगल्यावर NCBची धाड... काय आहे सत्य?

Update: 2021-10-21 08:39 GMT

मुंबईतील क्रुझ ड्रग केस प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान दिवसेंदिवस अडकतच चालला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत आर्यनचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला गेला. त्यानंतर त्याच्या तुरूंगवासात आणखी वाढ झाली. यासगळ्यात आज गुरूवारी पहिल्यांदाच शाहरूख त्याच्या मुलाला आर्यन ला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात गेला होता. त्यातच NCB ने शाहरूखच्या घरी मन्नचवर धाड टाकल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. अशा आशयाच्या बातम्या जोर धरू लागल्यावर NCB अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

"शाहरूखच्या घरी NCB केवळ काही कागदपत्रे जमा करण्यासाठी गेली आहे. मन्नतवर कोणत्याही प्रकारची धाड NCB ने टाकलेली नाही", असे स्पष्टीकरण NCB अधिकाऱ्याने दिले.

आर्यन खानच्या अटकेच्या १८ दिवसांनी नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो(NCB) शाहरूखच्या घरी मन्नत वर काही कागदपत्रांसाठी पोहोचलीच शिवाय NCB ने अभिनेता चंकी पांडे ची कन्या अनन्या पांडे हिच्या घरी देखील धाड टाकली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा NCB ऍक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळते आहे.

Tags:    

Similar News