नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्लांवर 500 कोटींच्या मानहानीचा दावा, न्यायालयाने बजावली नोटीस
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण आणि त्यामुळे व्यथित झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नागपुरातील दिवाणी न्यायालयात पाचशे कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. फोन टॅपिंग चे हे प्रकरण 2017-18 मध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.;
0