सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा, राज्यातील एका मंत्र्याची मागणी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने कुणाच्या दबावामुळे आत्महत्या केली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याच्या कुटुंबियांसह काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे असे मत मांडले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येण्याची गरज आहे.
"त्याचे सिनेमे कुठे थांबवले गेले, कुणी थांबवले, त्याला काही सिनेमांमधून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पाटण्याहून आलेला हुशार कलाकार आपण गमावला आहे.
हे ही वाचा..
सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं नेमकं कारण काय?
सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे हत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप
त्याची कहाणी भयंकर आहे आणि कुठल्याही नवोदित कलाकाराला अशा छळाचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली पाहिजे" अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.