कोरोनावरील औषधावरुन राज्य सरकारचा पतंजलीला इशारा

Update: 2020-07-04 01:30 GMT

पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.

हे ही वाचा..

वीज सुधारणा विधेयक, केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची शक्यता…

Special Report: केरळमधून बोलावून घेतलेल्या कोव्हीड योद्ध्यांची मुंबईत परवड

मोदींच्या लडाख दौऱ्याचा अन्वयार्थ

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल होऊन संभ्रम निर्माण होत आहे.कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी असे आवाहन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

Similar News