महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध असल्यामुळे राणे यांना ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ हा नवीन पक्ष काढावा लागला. मात्र, राणेंनी नुकताच आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.
‘नारायण राणे हे भाजपमध्येच आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. प्रश्न केवळ त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा आहे. शिवसेनेला विश्वासात घेऊन तो सोडवण्यात येईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या प्रवेशावर थेट भाष्य करणं टाळलं आहे.