महाराष्ट्रबंद: काय आहे आजच्या वृत्तपत्राच्या हेडलाईन

Update: 2021-10-12 04:23 GMT

लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद ची हाक महाविकास आघाडी सरकारने दिली होती. या संदर्भात राज्यात 11 ऑक्टोबरला बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान काही ठिकाणी तोडफोड झाल्याचं वृत्त आहे.

3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी भाजप नेते अजय मिश्रा यांच्या मुलाने या शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप केला आहे.  या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे. आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे. मात्र, ज्या आरोपीचे वडील केंद्रात मंत्री आहेत अशा आरोपीवर कारवाई करताना पोलिसांवर दबाव असण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोपीला शिक्षा व्हावी आणि केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

या बंदला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी या संदर्भात नक्की काय वृत्त दिलं आहे. जाणून घेऊयात


Full View

Tags:    

Similar News