हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात या ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्याना आवाहन

Update: 2021-11-14 02:57 GMT

मुंबई // कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं त्यांनी मनापासून अभिनंदन करत विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा निर्धार यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करेल.

कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन. असं ट्विट करत मंत्री शिंदे यांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले.

पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. असंही शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News