जिलेबी फाफडाला मालवणी खाज्याने उत्तर - ऍड. आशिष शेलार

ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपला अभूतपूर्व अस यश मिळाले आहे. आता यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेत भाजपचाच झेंडा लागेल, असं सांगत भाजप नेते ऍड. आशिष शेलार हानी कोकण वासीयांचे आभार मानले.

Update: 2021-01-18 14:12 GMT

ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपला अभूतपूर्व अस यश मिळालं. सिंधुदुर्ग मध्ये ४५ ठिकाणी भाजपाचा विजय झाला असून केवळ २० ठिकाणीच शिवसेनेला यश मिळालं असून राष्ट्रवादीला नशिबानं एका ठिकाणी यश मिळालं असून रत्नागिरीत तर ५५६ इतके भाजपचे सदस्य निवडून आले आल्याचे सांगत भाजप नेते ऍड. आशिष शेलार हानी कोकण वासीयांचे आभार मानले.

यावेळी शेलार यांनी, जिलेबी फाफडाच राजकारण करून शिवसेना नौटनकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाज्याने उत्तर दिलं तर कोकणात केवळ भाजप विजय मिळवला असून याचा अर्थ मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेत भाजपचाच झेंडा लागेल. विजयाची ही मुहूर्तमेढ झाली. भाजपच्या विजयाची नांदी झाल्याचे म्हंटल आहे.

Full View


Tags:    

Similar News