Satara Crime : तिहेरी हत्याकांडाने सातारा हादरला, विवाहबाह्य संबंधातून महिलेसह तिच्या मुलांचा खून

Update: 2022-06-18 07:21 GMT

सातारा जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून महिलेसह तिच्या मुलांचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग या गावच्या हद्दीत विवाहबाह्य संबंधातून प्रियकराने महिलेसह तिच्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हादरला आहे.

सातारा जिल्ह्यातील वेलंग गावातील योगिता आणि दत्ता नारायण नामदास यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. मात्र योगिताच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. तर त्यानंतर 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि योगिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यानंतर दत्ता नामदास याने योगिताची गळा दाबून हत्या केली. तसंच योगिताच्या दोन मुलांना ( समीर आणि तनु) विहीरीत ढकलून देण्यात आले. त्यानंतर आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावली आणि दत्ता याने त्याच्या मुळ गावी अकलूजला पलायन केले. मात्र स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने रहिमतपुर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दत्ता नामदास याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दत्ता नामदास याला ताब्यात घेतल्यानंतर मुलांना विहीरीत ढकलून दिले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी विहीरीतून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. मात्र या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News