मागील काही दिवसापासुन चालु असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत मी सरकारला सोडणार नाही. मागील अनेक वर्षापासुन विमा कंपन्यांनी खुप कमावले. एकीकडे डिजीटल इंडीया म्हणतात मग पुन्हा कागद कशाला मागतात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला.