काल भाजप नेत्यांकडुन शिवसेनेला पाठविलेल्या प्रस्तावावर काहीच उत्तर मिळत नसल्याचं म्हटलं जात होते यावर शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी “कोणताही प्रस्ताव येणार किंवा जाणार नाही. आधीच ठरल्याप्रमाणेच करा हाच प्रस्ताव आहे.” असं स्पष्ट केलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास हा जनतेच्या जनादेशाचा अपमान असेल असे राऊत म्हणाले.