देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे मराठा आरक्षण बारगळले- सुप्रिया सुळे

Update: 2021-08-10 08:55 GMT

लोकसभेत घटना दुरूस्ती विधेयकावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील विविध जाती समुहांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गोंधळ निर्माण केला आहे, अशी टीका सुळे यांनी केली. तसेच राज्यातील मराठा आऱक्षण बारगळण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा लवकरात लवकर द्यावा, तसेच मराठा आरक्षण कोर्टापुढे टिकेल यासाठी महाविकास आघाडी सरकारसोबत उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी, धनगर आरक्षणावरुनही मोठा गोंधळ निर्माण करुन ठेवला आहे. धनगर समाजाला भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊ असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांच्या अनेक बैठका झाल्या पण धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Tags:    

Similar News