दिल्ली दंगलीवर ४ दिवसांनी पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2020-02-26 09:23 GMT

दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दंगलीवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील नागरिकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत,

“ दिल्लीतल्या परिस्थितीची आपण माहिती घेतली असून पोलीस आणि इतर यंत्रणा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी दिल्लीतील माझ्या बंधु आणि भगिनींना आवाहन करतो की त्यांनी शांतता पाळून बंधूभाव राखावा”.

 

दंगलीच्या तब्बल चार दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली प्रतिक्रिया आली आहे. या दंगलीत आतापर्यंत सुमारे २० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर अडीचशेच्यावर लोक जखमी झाले आहेत.

Similar News