मुख्यमंत्र्यांचं भाजपला खुलं चॅलेंज...

Update: 2020-02-15 13:08 GMT

भाजप नेत्यांकडून सतत महाविकासआघाडी सरकार टिकणार नसल्याच्या वक्तव्यांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुक्ताईनगर येथे महाविरासआघाडीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विरोधी पक्षांचं आपसात खुटपुटतय, आमचं नाही, आम्ही एकत्र आहोत, मजबुत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी प्रथमच भाजपला सरकार पाडून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलंय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/928185404250468/?t=0

सोबतच, एप्रिलनंतर ऑपरेशन लोटस राबवतो असं म्हणणाऱ्या भाजपला (BJP) जनतेनं लोटलं असा टोला भाजपच्या ऑपरेशन लोटसवरुन उद्धव ठाकरेंनी लगावला. राज्यात महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सत्ता स्थापनेपासुन विरोधकांकडून हे तीन विचारांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही असा दावा केला जातोय. यावर उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल भाजपने सरकार पाडून दाखवावं. आम्ही सत्तेसाठी हापापले नाही अशी भावना व्यक्त केली.

Similar News