केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मतदार संघात कसायांसोबत झालेल्या बैठकीत गोहत्येचे समर्थन केले होते. तसेच मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. माफी न मागितल्यास दानवे यांची भाजपने हकालपट्टी करावी अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.