पोलिस नको, बंदुक परवाने द्या- लक्ष्मण पवार

Update: 2019-12-27 15:52 GMT

बीडच्या गेवराई शहरात चोऱ्यांचं वाढतं दिवसेंदिवस वाढत आहे. या विरोधात आज नागरिकांनी मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) यांच्या नेतृत्वात काढण्याच आला होता. यावेळी “वाढत असणाऱ्या चोऱ्या पोलिसांमुळेच वाढत आहेत. पोलिसांचं या चोरांना अभय आहे. पोलिसांच्या संगनमतानेच चोऱ्या होत आहेत.” असा धक्कादायक आरोप लक्ष्मण पवार यांनी केला आहे.

“दिवसेंदिवस गेवराई शहरात चोरीच्या घटना वाढत आहेत. एका रात्रीत अनेक ठिकाणी घरफोड्या होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र पोलिस त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहेत. म्हणून लोकांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास राहिलेला नाही. पोलीसही नको, पोलीस ठाणेही नको, आता आम्हाला बंदुकीच्या परवान्यासाठी ना हरकत द्या.” अशी खळबळजनक मागणी पवार यांनी केली आहे. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/844239612693312/?t=1

Similar News