Bird Flue: चा महाराष्ट्रात शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

Update: 2021-01-11 03:14 GMT

कोरोनाचं संकट संपत नाही तोच आता देशावर बर्ड फ्लूचं संकट आलं आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान आणि गुजरात बरोबरच महाराष्ट्रातही बर्ड फ्लू ने शिरकाव केला आहे. (Himachal Pradesh, Rajasthan, Madhya Pradesh, Kerala, Gujarat, महाराष्ट्र केरळमध्ये बर्ड फ्लू मुळे राज्य आपत्ती जाहीर केली आहे.

राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिलीये. त्यामुळं आता तातडीनं पावलं उचलली जात आहे.

कोणत्या राज्यात किती पक्षांचा मृत्यू?

हिमाचल प्रदेश २३००

केरळ १२००

राजस्थान ५००

मध्य प्रदेश ३२०+

गुजरात १२४+

महाराष्ट्र ८००

ओडिशा १२०

उत्तर प्रदेश १०+

छत्तीसगड ४

या मध्ये प्रामुख्याने बदक, कावळे, टिटहरी, बगळे आणि कोंबडी या पक्षांचा समावेश आहे.

दरम्यान देशात ज्या भागांमध्ये बर्ड फ्लू मुळे पक्षी मरण पावत आहेत. त्याभागातील कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. चिकन आणि अंड्यावर बंदी घालण्यात आली आहे. मृत पक्षांवर योग्य़ रासायनिक पदार्थ टाकून जमिनीत पुरले जात आहे. तसंच जाळलं जात आहे. हिवाळ्या मध्ये अनेक पक्षी दुसऱ्या राष्ट्रामधून स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे बर्ड फ्लू आपल्या देशातील पक्षांना झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय काळजी घ्याल...

एखादा पक्षी जमिनीवर मरून पडलेला असेल तर तात्काळ आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्या...

Tags:    

Similar News