पुरानंतर झालेल्या हानीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांना ऊस नको भात लावा अशा आशयाचा सल्ला दिला आहे. केंद्रीय सहसचिव डॉ पी. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने सांगली मधल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी पथकातील एका सदस्याने शेतकऱ्याला असा अजब सल्ला दिला आहे. एक एकर शेतात भात लावला तर उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल शेतकऱ्याने केल्यानंतर या सदस्याला आपली चूक उमजून आली असावी, कारण त्यानंतर हा सदस्य गप्प बसला.
केंद्रीय पथकाच्या या वर्तणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रीया मॅक्समहाराष्ट्र वर प्रसिद्ध करू.