"तुम्ही बिघडे नवाबची जी उर्जा आहे ती सुधरे नवाबमध्ये बदलली पाहिजे" ; अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Update: 2021-11-02 02:13 GMT

मुंबई // राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल एक ट्विट करून खळबळ उडवून दिली होती . मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. त्यावरून अमृता फडणवीस यांनी माध्यामांशी बोलाताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, "मी परत एकदा सागंते माझ्यावर तुम्ही जे आरोप करत आहात आणि माझ्या माध्यामातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे, आमच्याकडे असं काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असं काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही." अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

सोबतच "मला वाटतं की ते मलिक यांनी त्यांच्या जावायला विचारावं की कोण कोणाच्या पाठीशी आहे. मी एवढच सांगेन बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा." असा घणाघात फडणवीस यांनी केला.

जेव्हा एखाद्याला काही सूचत नाही, तेव्हा तो सगळं खराबच पाहतो किंवा खराब करायचा प्रयत्न करतो. मी माझे केवळ विचार मांडते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते करत राहील. कुणीही मला थांबवू शकत नाही. असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.

याचबरोबर,"तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे? तुम्ही बिघडे नवाबची जी उर्जा आहे ती सुधरे नवाबमध्ये बदलली पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. नाहीतर आपलं खरं नाही." असं अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News