मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे पाणी तोडून टाका- अजित पवार

Update: 2019-06-25 09:10 GMT

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहित अनेक मंत्र्यांचे नाव मुंबई महापालिकेने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. यांचं पाणी तोडून टाका... बिना आंघोळीचे येवू दे विधानसभेत त्याशिवाय यांना कळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार कडाडले.

मुंबईत कोट्यवधी लोक राहतात. त्यांनी जरा पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन लागलीच कापले जाते. ताबडतोब त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कुणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहित अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील मीटरचे पैसे भरले जात नाही. राज्य सरकारची दयनीय अवस्था झाली आहे का? पैसे वेळेवर भरले का जात नाही? मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

मुंबई महापालिका डिफॉल्टर यादीत टाकत असेल तर हा कमीपणा नाही का? अधिकारी झोपा काढतात का? महाराष्ट्र काय धडा घेईल. जनता म्हणेल हेच पैसे भरत नाही तर आपण तरी कशाला भरावे ? याची नोंद घ्यावी असेही अजित पवार म्हणाले.

Similar News