सोलापुरात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, ॲड. असीम सरोदेंचा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा...

Update: 2021-10-27 02:34 GMT

गेल्या काही काळापासून राज्यातील सर्वच महानगरांमधील कचऱ्याचा प्रश्न हा वारंवार ऐरणीवर येत आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. या सगळ्यांमुळे नागरी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. कचरा डेपोतच ॲड. असिम सरोदे यांनी या कचरा डेपोतच पत्रकार परिषदेचे आयोजन करून सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपो संदर्भात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

सोलापूरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कायदेतज्ञ असिम सरोदे म्हणाले, "कचरा व्यवस्थापन आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे मानवी आरोग्य, वातावरणातील प्रदूषण, पर्यावरणाची समस्या हे मुद्दे सरकारी अनास्थेमुळे गुंतागुंतीचे बनत चालले आहेत. सोलापूर- तुळजापुर रस्त्यालगतच्या हद्दवाढ भागात ५५ एकर जमीन शहर घनकचरा साठवण्यासाठी राखीव ठेवली आहे आणि गेल्या ७० वर्षांहूनही अधिक वर्षांपासून येथे कचरा साठवला जातोय. या ठिकाणची ९ एकर जमीन बायोएनर्जी प्रकल्पासाठी देखील देण्यात आली आहे. परंतू हा प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत.

Tags:    

Similar News