युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईमधल्या वरळीमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ते थोड्याच वेळात आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करतील. अर्ज भरण्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी मातोश्री निवासस्थानी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या गादीला वंदन केलं.
आदित्य हे निवडणूक लढवणारे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती आहेत त्यामुळं त्यांच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलंय.