जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत ५ जवान शहीद

Update: 2021-10-11 09:04 GMT

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसते आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ भागा सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका कनिष्ठ अधिकारी आणि ४ सैनिक आहेत. राजौरी सेक्टरमधील पीर पांजाल भागात ही चकमक झाली आहे. लष्कराने या भागाची नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील एका गावात दहशतवादी लपल्याची माहिती सैन्य़ाला मिळाली होती. या माहितीनुसार सैनिकांनी या भागात शोधमोहीम राबवली. या दरम्यानच दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. याला तातडीने उत्तर देण्यात आले, पण या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांनी ७ नागरिकांनाही ठार केले आहे. यामध्ये एका शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकांचा समावेश आहे.

दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:    

Similar News