कल्याणमध्ये तरूणीची आत्महत्या नाही तर हत्या, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Update: 2022-06-17 06:03 GMT

कल्याणमध्ये लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरूणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे.

अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याण मध्ये उघडकीस आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून या पीडितेच्या कुटूंबियांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. यावेळी चित्रा वाघ यांनी तरूणीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. तर यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयासह पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी पीडितेवर लैगिंक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मुलीच्या कुटुबीयांचे म्हणणे आहे की तिने आत्महत्या केली नसुन तिची हत्या केली गेली. त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी वाघ यांनी केली. तसेच भादंवि कलम ३७६, डी शक्ती कायदा, ई, एफ.व आयटीएट प्रमाणे गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

काय आहे घटना?

कल्याण येथील कोळसेवाडीत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सात तरुण गेल्या दीड वर्षापासून लैंगिक एका तरूणीवर अत्याचार करत होते. या गैरकृत्यामध्ये एका तरुणीचा सहभाग होता. तसेच या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याने कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. तर कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याण मध्ये पीडित कुटुंबीयांची त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच 12 वीत 71 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती. या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यांपैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे.

पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. इस्टाग्रामवरील एपवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात मोठ्या घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. तिचे कुंटूंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. आठ दिवसांनी पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले. पुढे बोलताना कायद्याची प्रभावी अमलबजावणी झाली तरच नराधम विकृताना कुठे तरी चाप बसेल अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Tags:    

Similar News