पी चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल 'हेच का अच्छे दिन'

Update: 2019-12-05 16:20 GMT

INX मीडिया प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आज माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिल्लीच्या कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक (Economy) परिस्थिती बाबत चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा...

ऊस लागवड़ीची एक डोळा पद्धत शेतकऱ्यांच्या फ़ायद्याची की तोट्याची?

पुराने उद्ध्वस्त झालेल्या शाळा कधी दुरुस्त होणार?

कांदा महागला, अर्थमंत्री म्हणतात मी जास्त कांदा खात नाही

देशाची दरडोई उत्पन्न सतत घटत आहे. 8 चे 7, 7 चे 6.6, 6.6 चे 5.8, 5.8 चे 5 आणि 5 च वरुन आता 4.5 वर आलं आहे.

हे सरकार चे ‘अच्छे दिन आहे’ का? असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला. आम्ही भाग्यवान होऊ, जर वर्षाच्या शेवटी GDP चा दर 5 टक्क्याला स्पर्श करेल. तसंच यावेळी त्यांनी विकासदराच्या संदर्भात भाष्य करताना विकासदराच्या मापनासंदर्भात शंका उपस्थित करत सध्याच्या विकासदरापेक्षा हा विकास दर 1.5 टक्क्यांने कमी असल्याचं म्हटलं आहे.

Similar News