सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच महाराष्ट्र भाजपच्या पहिल्या फळीतील नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली. शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीनं चंद्रकांतदादांना ओळखा आणि १०१ रूपयांचं बक्षीस मिळवा, असं अनोखं आंदोलनं आज मुंबईत केलं.