लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत. त्यामुळं आतापासूनच २०१९ ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झालीय. या चर्चेत आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचंही नाव चर्चेत आलंय. शिवसेनेचे प्रवक्ते,खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असं वक्तव्य करत चर्चेला गती देण्याचा प्रयत्न केलाय. यासंदर्भात मुंबईकरांच्या प्रतिक्रिया पाहूयात.